Name:
Location: Pune, Maharashtra, India

5.16.2006

युगंधर पुस्तकात अनेक प्रकारच्या बाणांविषयी लिहिलय. त्यातल्या एका प्रकाराबद्दल मनात खुपच औत्सुक्य निर्माण झालय.तो बाण शरीरात गेल्यावर जितका त्रास होतो त्याहुन जास्त त्रास शरीरातून बाहेर काढताना होतो. बाण रक्तनलिका कापल्याखेरीज व स्नायु फ़ाडल्याशिवाय बाहेर येउच शकत नाही असे वर्णन आहे त्याचे!त्याच्या टोकाला जर विष लावले असेल तर? हा म्हणजे "धरल तर चावतय, सोडल तर पळतय" अशातलाच प्रकार!

पण यापेक्षाही अधीक धोकादायक बाण या जगात अस्तित्वात आहे! वर उल्लेखिलेला बाण तरी फ़क्त शरीरात जखमा करतो.पण ह्या बाणाने केलेल्या जखमा थेट मनालाच होतात!आणि मनाला झालेल्या जखमा सहसा भरुन येत नाहीत! हा सर्वशक्तिमान बाण आहे वाक‍बाण!

कुठल्याही शस्त्राने होणार नाही एवढी हानि तोंडून निघालेले शब्द करुन जातात! साक्षात ब्रम्हास्त्र सुद्धा एक वेळ मागे घेता येइल, पण मुखातून सुटलेला शब्दरुपी बाण कधीच मागे घेता येत नाही! आणि त्यातूनच जर तो आपल्या प्रिय व्यक्तीच्या मुखातून आला असेल तर? दृष्य स्वरुपात नसली तरी कायम ठसठसत राहणारी एक वेदना आयुष्याच्या अंतापर्यंत आपली सोबतीण होते!

अशी एखादी जखम स्वत:च्या मनात ठसठसायला लागली की प्रत्यक्षात साक्षात सुर्याचा पुत्र असलेल्या व केवळ दैवयोगापायी आयुष्यभर 'सुतपूत्र' म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाबद्दल सहानुभूती निर्माण होते.
कर्णाला "मला एकदा आई म्हण" अशी भिक्षा मागणा-या कुंतीला कर्णाने काय उत्तर दिले असेल याचा विचार करता करता सहज मनात आलेल्या ४ ओळी लिहुन आजचे लिखाण संपवतो!

कुंती वदली अरे कर्णा फ़क्त एकदाच म्हण मला आई!
राजमाता संबोधून का घायाळ करतोस मातेच्या हृदया?
कर्ण वदला कुठे होती ह्या आईची पुण्याई?
जेव्हा "सूतपुत्र" शब्दरुपी बाण करीत होते या कर्णाची मृगया?

1 Comments:

Blogger निखिल said...

Sameer tumache likhan baharat jaat aahe.... Ughandhar varil lekh awadala....

2:32 PM  

Post a Comment

<< Home