anudinee

Name:
Location: Pune, Maharashtra, India

1.02.2008

अ: अरे ते 'अमुक अमुक' काम केलस का?
ब: नाही रे! वेळच नाही मिळाला. मनात असुनही काम करता येत नाहीत. वेळच नाहीये!

इथे वरच्या संवादात 'अमुक अमुक' च्या जागी काहीही घातल तरी खालच उत्तर मात्र ९९.९९% वेळा अगदी तेच राहत.

'वेळच मिळत नाही' ही सबब मी स्वत: अनेक ठिकाणी पळवाट म्हणून वापरतो. ब-याचदा वरील संवादाच्या 'अ' आणि 'ब' या दोन्ही ठिकाणी मी स्वत:च असतो आणि माझ मन 'ब' ला झुकत माप देत. त्यानी तात्पुरत समाधान मिळत, पण मनाला ते पटत नाही.

आज हा सर्व उहापोह करण्याच कारण म्हणजे बरोब्बर एक वर्षापुर्वी मी केलेल्या संकल्पांचा आढावा घेताना माझ्या लक्षात आलय की सालाबादप्रमाणे याही वेळी "योजलेल्या संकल्पांची पूर्ती करण" हा संकल्प करायला हवा होता अस वाटायला लागलय! आणि या संकल्पपुर्तीतला अडथळा एकच .. "वेळ मिळत नाही" !

या वर्षी एकच संकल्प केलाय. "वेळच मिळत नाही" ही सबब सांगायची वेळच येउ द्यायची नाही!

"केल्याने होत आहे रे .. आधी केलेची पाहिजे" हा मंत्र लक्षात ठेवायचा ...

आणि हो, लिहून संपण्यापुर्वीच .. "नुतनवर्षाभिनंदन" !

नाहीतर नंतर कोणी "सगळ लिहिलत आणि येवढच कस विसरलात" अस विचारल तर सांगाव लागायच "नाही हो...लक्षात होत तस ... पण वेळच मिळाला नाही शेवटी ते लिहायला! ..." !