घामाचा वास किती लोकांना आवडतो?
बस, लोकल अथवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी सर्वात प्रकर्षाने जाणवणारा गंध म्हणजे घामाचा गंध! आणि हल्लीच्या टापटिपीनी राहाणा-या जगात या वासाला काहीच किंमत नाही. किंबहूना ’अंगाला घामाचा वास येणे’ हा एक कुचेष्टेचा विषय झालाय.
पण भारतासारख्या भौगोलीक पार्श्वभुमी लाभलेल्या देशात घाम हा येणारच! अगदी खर सांगायच तर ’घाम’ आणि ’भारतीय संस्कृती’ यांच एक अतूट नात आहे अस मला वाटत.लहानपणी ’स्कॉलरशीप’ च्या अभ्यासात मराठी म्हणी, वाक्प्रचार यांचा अभ्यास करावा लागायचा. तेव्हा ’घामाचा पैसा’, ’घाम गाळणे’, ’घाम फुटणे’, ’घामाने शिंपणे’ असे अनेक वाक्प्रचार माहित झाले. पण त्यांचा अर्थ कळायला वेळ लागला.
आता विचार करताना मला लहानपणी आई-वडीलांनी दिवसभर बाहेर कामावर राबून परत आल्यानंतर प्रेमाने पोटाशी धरलेले, कुशीत घेतलेले दिवस आठवतात. तेव्हा येणारा घामाचा वास अजुनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा कळण्याच वय नव्हत पण आता समजत की तो घाम त्यांनी आपल्या पोरांच्या उज्वल भविष्यासाठी आटवलेल्या रक्ताच बाय-प्रॉडक्ट होता...पहिल्या पावसानंतर दरवळणारा मृदगंध पुढे येणा-या ’सोनियाच्या पीकाची नांदी’ असतो त्याचप्रमाणे आई-वडिलांनी गाळलेला घाम हा पुढे चालून मुलांच्या आयुष्यात ’सोनियाचे दिन’ यावेत यासाठी असतो.
माझे हे विचार हल्लीच्या ’डी-ओडोरंट’ च्या जमान्यात हास्यास्पद ठरण्याचाच संभव जास्त आहे. परंतु घामाच्या वासाला नाक मुरडणा-या लोकांपाशी माझी एकच विनंती आहे, कधीतरी मनापासून झटून एखाद्या गोष्टीसाठी घाम गाळा. त्या घामाचा वास तुम्हाला नाही आवडला तरी तुमच्या कामामुळे ज्याच भल झालय त्याला विचारा, त्याला हा ’घामाचा वास’ अत्तरापेक्षाही सुगंधी वाटेल.
आणि शेवटी ’दाम करी काम’ ऐवजी ’घाम करी काम’ झाल्यास या देशाचेही भले होईल .. !
बस, लोकल अथवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी सर्वात प्रकर्षाने जाणवणारा गंध म्हणजे घामाचा गंध! आणि हल्लीच्या टापटिपीनी राहाणा-या जगात या वासाला काहीच किंमत नाही. किंबहूना ’अंगाला घामाचा वास येणे’ हा एक कुचेष्टेचा विषय झालाय.
पण भारतासारख्या भौगोलीक पार्श्वभुमी लाभलेल्या देशात घाम हा येणारच! अगदी खर सांगायच तर ’घाम’ आणि ’भारतीय संस्कृती’ यांच एक अतूट नात आहे अस मला वाटत.लहानपणी ’स्कॉलरशीप’ च्या अभ्यासात मराठी म्हणी, वाक्प्रचार यांचा अभ्यास करावा लागायचा. तेव्हा ’घामाचा पैसा’, ’घाम गाळणे’, ’घाम फुटणे’, ’घामाने शिंपणे’ असे अनेक वाक्प्रचार माहित झाले. पण त्यांचा अर्थ कळायला वेळ लागला.
आता विचार करताना मला लहानपणी आई-वडीलांनी दिवसभर बाहेर कामावर राबून परत आल्यानंतर प्रेमाने पोटाशी धरलेले, कुशीत घेतलेले दिवस आठवतात. तेव्हा येणारा घामाचा वास अजुनही माझ्या लक्षात आहे. तेव्हा कळण्याच वय नव्हत पण आता समजत की तो घाम त्यांनी आपल्या पोरांच्या उज्वल भविष्यासाठी आटवलेल्या रक्ताच बाय-प्रॉडक्ट होता...पहिल्या पावसानंतर दरवळणारा मृदगंध पुढे येणा-या ’सोनियाच्या पीकाची नांदी’ असतो त्याचप्रमाणे आई-वडिलांनी गाळलेला घाम हा पुढे चालून मुलांच्या आयुष्यात ’सोनियाचे दिन’ यावेत यासाठी असतो.
माझे हे विचार हल्लीच्या ’डी-ओडोरंट’ च्या जमान्यात हास्यास्पद ठरण्याचाच संभव जास्त आहे. परंतु घामाच्या वासाला नाक मुरडणा-या लोकांपाशी माझी एकच विनंती आहे, कधीतरी मनापासून झटून एखाद्या गोष्टीसाठी घाम गाळा. त्या घामाचा वास तुम्हाला नाही आवडला तरी तुमच्या कामामुळे ज्याच भल झालय त्याला विचारा, त्याला हा ’घामाचा वास’ अत्तरापेक्षाही सुगंधी वाटेल.
आणि शेवटी ’दाम करी काम’ ऐवजी ’घाम करी काम’ झाल्यास या देशाचेही भले होईल .. !
2 Comments:
Nicely written.
Mast lekh re...
khup diwasani blog update jhalela pahun aanad jhala
Post a Comment
<< Home