Name:
Location: Pune, Maharashtra, India

1.17.2007

१४ जानेवारीला सुर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' अस म्हणत प्रत्येक मराठी माणूस आपल्या आप्तांना शुभेच्छा देतो. मराठी स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. आणि बरीच लोक मोबाईल द्वारे एकमेकांना "हॅपी संक्रांत" ... "संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा" ... असे संदेश पाठवतात.

पण १४ जानेवारी हा दिवस मराठी माणसाच्या इतिहासात मात्र काळा दिवस म्हणूनच ओळखला जातो. १४ जानेवारी, १७६१ साली पानिपताच्या लढाईत अहमदशहा अब्दालीने सदाशीवराव भाउंचा पराभव केला. मराठे अखेरच्या क्षणी हाराकिरी आणि फाजील आत्मविश्वास या दोन गोष्टींमुळे रसातळाला गेले. या युद्धात विश्वासराव पेशवा आणि सदाशिवराव भाऊ असे मराठेशाहीचे दोन आधारस्तंभ धारातिर्थी पडले. मराठ्यांचे जवळपास पस्तीस हजारांचे सैन्य या लढाईत कापले गेले. कित्येक आयांची तरणीबांड पोरं, कित्येक सुवासिनींच्या भाळावरच कुंकू, कित्येक म्हाता-या जीवांच भविष्य आणि मराठेशाहीनी रंगवलेली दिल्ली तख्तावर राज्य करण्याची स्वप्नं या सगळ्या गोष्टी १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशीच धुळीला मिळाल्या.

आत्मविश्वास खचलेल्या मराठी मनावर या युद्धाचा इतका पगडा बसला की "विश्वास कसा ठेऊ? विश्वास तर पानिपतावरच गेला""परीक्षा कशी झाली काय विचारता? पानिपत झाल ..."असे पराभूत मनोवृत्तीचे दर्शन घडवणारे वाक्प्रचारच तयार झाले आणि सर्रास वापरले जाउ लागले.

आज आपण "हॅपी संक्रांत" वगैरे जरी म्हणत असलो, तरी मराठीत संक्रांत या शब्दाचा अर्थ कधीच चांगल्या अर्थाने वापरला जात नाही असे मला वाटते. त्यामुळे अश्या शुभेच्छा देण्यापेक्षा "गोड-गोड(शूभ-शूभ?) बोला" असा सकारात्मक संदेश देणच जास्त संयुक्तीक आहे अस माझ मत आहे.

पानिपताच्या पराभवाच आणि "घरादारावर संक्रांत येणे" या वाक्प्रचाराच घनिष्ट नात हेच तर सुचवत नाही ना?

2 Comments:

Blogger Surendra said...

You are absolutely correct. The last line is perfect and I never noticed it.

Sankrant ha shabda marathit kadhich changlya arthane vaparla jat nahi.

4:52 PM  
Blogger Harshal said...

hey,

Panipat baddal tumhi farach negative bolta rao !

panipat mhanje marthyancha tejane talpnara ithihaas ! martahi manus deshasathi kay karu shakto tyache udaharan aahe !

Kuthlehi sankat ale tari gadun kase ubhe rahayche he sadashivrao bhauni panipatatch mala shikavle.

So No more regrets for PANIPAT ! amhi mitra tar nehmi panipat chi thorvi gaat asto!

Thnx to vishwas patil jyani ek maharashtrachya bhalavarcha kalank pusla ani khare kay te panipat pustkat sangitle.

Jay Maharashtra

12:16 PM  

Post a Comment

<< Home