Name:
Location: Pune, Maharashtra, India

3.23.2007

- बांगलादेश भारताविरुद्ध खेळलेल्या १५ पैकी १३ सामने हरलाय.
- बांगलादेशकडे चांगले 'फ़ास्ट बॉलर' नाहीत.
- बांगलादेशने अधुनमधून मोठ्या संघांना हरविले असले तरी त्यांच्या खेळात सातत्य नाही.
- त्यांनी जिंकलेल्या सामन्याची "सट्टेबाजी" च्या प्रकरणासाठी चौकशी केली जाते - इति एक खवचट पुणेकर!
- त्यांच्या संघाचे सरासरी वयोमान २२ वर्षे आहे.


- भारतीय संघात ३००च्या वर सामने खेळलेले ३ खेळाडू आहेत. चौथा २९० च्या आकड्याजवळ आहे.
- भारतीय संघातील ३ फ़लंदाजांच्या नावावर प्रत्येकी दहा हजाराहून जास्त धावा आहेत.
- भारताती बांगलादेशला घरी-दारी सदैव धूळ चारलेली आहे. (एकदाच आपण हरलोय म्हणा .. पण काळे काजळच सौंदर्याला नवे परीमाण देते ...चंद्रावरील डागच चंद्राला स्वर्गीय सौंदर्य बहाल करतात ... अपवादच नियम सिद्ध करतात ... )
- आपण बांगलादेश वगैरे बरोबर खेळण्याच्या फंदातच पडू नये!
- खरा सामना भारत-श्रीलंका यांच्यातच आहे!


दिनांक १७ मार्च
- भारत सर्वबाद १९१ - भारत पूर्ण ५० षटके खेळू शकलेला नाहे.
- भारताचे केवळ ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले (त्यातले दोघे १०व्या आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आले होते!)
- भारताची सामन्यातील दुसरी सर्वोत्तम भागीदारी ११व्या गड्यासाठी झाली
- भारताने २ धावांत ५ गडी गमावले.
- प्रमूख भारतीय गोलंदाजांनी मिळून केवळ ३ बळी मिळवले (२ सेहवागला मिळाले)
- फलंदाजाचा 'कॅच' टाकुन त्याला जीवदान दिल्यानंतर धोणी-भज्जी-युवी त्रयी निर्लज्जासारखी हसत असल्याचे कॅमेराने पकडले.
- भारतीय क्षेत्ररक्षकांनी एकूण ४ संध्या गमावल्या.

या सामन्यातील पराभवाने द्रवीडच्या सामन्यापुर्वीच्या "भारताने प्रतिस्पर्ध्याला कमी लेखू नये" या वाक्याला संघाने कृतीची जोड दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आणि आता खरोखरच "खरा सामना भारत-श्रीलंका यांच्यातच आहे"! ( भारत बर्मूडा बरोबर जिंकेल हा आशावाद बाळगायचा न??)

1 Comments:

Blogger निखिल said...

Shevati don mahinyachya antrane blog update zhala.....lihit raha re....

3:02 PM  

Post a Comment

<< Home